कुणास ठाऊक मनात ऐसे काय दाटले !
मला आताशा अशी अवेळी सुचते कविता !!
तोच बिछाना, तेच पांघरूण, तेच उसासे !
स्वप्नांचीही नक्षी होऊन रुणझुणते कविता !!
तिचे लाजणे पुन्हा आठवून हरवून जातो !
भानावरती येता, कविता हरवून जाते !!
नसेल केली आयुष्याची माझ्या देखील,
इतकी खटपट यमकासाठी भावुन जाते !!
-रोहित ऊर्फ दुष्यंत
very good
उत्तर द्याहटवाbro