सोमवार, २१ मार्च, २०११

मित्रा...

हार क्षणिक असते मित्रा...
हरण्यात कसलं भय ?
पुन्हा पुन्हा हरून जिंकण 
हेच खरं होय !

रुसू नकोस कोणावरही,
दोष कुणा देऊ नकोस...
जगत राहा जगण्यासाठी
पाऊल मागं फिरवू नकोस !

भंग होईल ते स्वप्न,
बघूच नये असं नाही..
सत्य देखिल कधीतरी,
स्वप्ना सारखं जगून बघ ! 


जगाच्या आकाशात तुझी भरारी,
नसेलही ऊंच कदाचित..
तुझ्यासाठी तुझं आकाश
शोध.. स्वच्छन्द उडण्यासाठी !!

२ टिप्पण्या:

अभिप्राय नोंदवा :