आता पाऊस नाही येणार, वारा गाणे नाही गाणार !
मन मात्र पुढच्या पावसापर्यंत हिरवंगार राहील !!
अशी कोवळी हुरहूर लाऊन गेलाय,
क्षितीजालाही कानोसा लागू नये असा दूर !
पण "त्याचा" मृद्गंध भिनतोय, मातीचा श्वास होऊन !
इंद्रधनुष्याची ती पश्चिमसंध्या आजही गाते, "त्याच्या" बरसण्याचा भास होऊन !!
-रोहित ऊर्फ दुष्यंत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
अभिप्राय नोंदवा :