Sunday, May 20, 2012

उदंड होते कधी स्तब्धता !


कुणास ठाऊक चिंब भिजावे वाटत असता,
दाटून येता नभ मेघांनी, नको वाटते !!

कुठल्याशा त्या प्रश्नासाठी फरफट सारी,
उत्तर अवघे गवसू येता, पुरे वाटते !!

शून्यांची गणितेही सारी जमेस जाता,
आनंदाच्या झोळीलाही 'रिते वाटते' !!

कल्लोळांच्या आलापीचे यमक रोजचे,
उदंड होते कधी स्तब्धता, बरी वाटते !!

कधी अवेळी दाटून येते कुठली कविता,
विरते स्पंदन आवेशाचे, मुके वाटते !!

- रोहित ऊर्फ दुष्यंत

No comments:

Post a Comment

अभिप्राय नोंदवा :