पाऊस पडत असेल बघ
तुझ्या आठवांच्या गावी ।
मनात अशी रेशीमओळ
उगीच मला सुचेल का!!
तुझी चाल लाऊन सखे
गाणे होते कवितांचे ।
लय अशी वेड्या वेळी
हृदय उगीच धरेल का!!
जाग येतेच समेवर
झोप देखील मंत्रमुग्ध ।
तुझ्या चांदणचाहूलीची
वेळ कधी चुकेल का!!
नाही म्हणून पाऊस देखील
ऐकत नाही कुणाचं ।
मुसळधार कोसळताना
मन कोरडे ठेवेल का!!
जरा धरेला ओलेत्याने
भिजवून जाता नभ आवेगा ।
इंद्रधनूची पखरण होता
सुख कोरडे राहिल का!!
लिहितो नाही शिंपण होते
तुझ्या किती गं आठवणींची ।
सरता शाई शब्दो शब्दी
कविता होणे राहिल का!!
- रोहित ऊर्फ दुष्यंत
तुझ्या आठवांच्या गावी ।
मनात अशी रेशीमओळ
उगीच मला सुचेल का!!
तुझी चाल लाऊन सखे
गाणे होते कवितांचे ।
लय अशी वेड्या वेळी
हृदय उगीच धरेल का!!
जाग येतेच समेवर
झोप देखील मंत्रमुग्ध ।
तुझ्या चांदणचाहूलीची
वेळ कधी चुकेल का!!
नाही म्हणून पाऊस देखील
ऐकत नाही कुणाचं ।
मुसळधार कोसळताना
मन कोरडे ठेवेल का!!
जरा धरेला ओलेत्याने
भिजवून जाता नभ आवेगा ।
इंद्रधनूची पखरण होता
सुख कोरडे राहिल का!!
लिहितो नाही शिंपण होते
तुझ्या किती गं आठवणींची ।
सरता शाई शब्दो शब्दी
कविता होणे राहिल का!!
- रोहित ऊर्फ दुष्यंत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
अभिप्राय नोंदवा :