रविवार, २२ मे, २०११

उसंत

सारे सरले किलबिल जगणे
कुणास आता उसंत नाही !

लाटा होत्या, सारे जिवलग
तिला किनारा पसंत नाही !

किती मनांच्या तारा जुळल्या
प्रवास इथला अनंत नाही !

नवीन वाटा नवीन सोबत
आठवणींना दिगंत नाही !

गुरफटलेली तुझी आठवण
तो गुलाब आता जिवंत नाही !

अशी स्तब्धता लेऊन सारे
कुठेच आता वसंत नाही !

 


1 टिप्पणी:

अभिप्राय नोंदवा :