मनाशीच संवाद साधायचे ! मनाचे उसासे गिरवायचे !! अर्थांत शब्दांस फिरवायचे ! निखारे मनाचे शमवायचे !! क्षणाने क्षणाला भुलवायचे ! निमिषात आकन्ठ भिजवायचे !! अश्रूंसवे हास्य सजवायचे ! प्रश्नास विश्रांत निजवायचे !! नव्या स्वप्न-जगतास प्रसावायचे ! सुखी शांत आत्म्यास वसवायचे !! - दुष्यंत उर्फ रोहित
Sunday, September 19, 2010
हरवलेला दरवळ
का कोण जाणे, आता कविता अचानक अडखळते...
शब्द तर जुळत जातात सरळ, सम काही सापडत नाही !!
शब्दांतले अर्थ चाचपडत नुसता शाईत खेळत राहतो...
ओळी जमतात गजर्यासारख्या गंध तेवढा सापडत नाही !!
कागदावर शब्द सरसर येतात पक्ष्यांच्या थव्यासारखे...
काही चपखल, काही अवखळ, यमक तेवढं गवसंत नाही !!
- रोहित ऊर्फ दुष्यंत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Ithe te poster version pan taak!!
ReplyDeleteAe ekdam sahhiii ahe!!!
ReplyDelete